| महाड | प्रतिनिधी |
पन्नास वर्षापूर्वी 1971 च्या तुकडीचे महाड वि.ह. परांजपे हायस्कूलचे तब्बल 50 वर्षापूर्वीचे मित्र महाडमध्ये हायस्कूलसमोर एकत्र भेटले. त्यांनी एकमेकांना भेटत मिठया मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
रस्त्यावरून जाणार्या येणार्यांनाही कुतुहल वाटेल असेच असेच वातावरण होते. जमलेल्या मित्रानी सांस्कृतिक प्रथेनुसार प्रथम ग्रामदैवत असलेल्या विरेश्वर मंदीरांत जाऊन दर्शन घेतले. मंदिराचे विश्वस्त दिपक वारंगे, रमेश नाटेकर, संजय पवार व अन्य ट्रस्टीनी सर्वांचेच स्वागत करून कौतुक केले. महाड व्यतीरीक्त अन्य भागांतून येणारी आणि स्थानिक वर्ग मित्र सायंकाळी 5 वाजता नाते येथील सुधाकर मांडवकर यांचे हॉटेल अंगण मधील प्रांगणात बघता-बघता 20-22 जण आपापल्या वर्गमित्राला घेऊन हजर झाले, त्याध्ये स्थानिक, पनवेल, पुणे म्हसळा, तळा भागात वास्तव्यास असलेले विद्यार्थी होते.
पुणे येथे रहाणारा सुधीर गद्रे याच्या मनांत आले त्यांनी दीपक कोटीया, संजय खांबेटे, महाड मधील नंदशेठ, अविनाश टक्के, विनायक खोडके यांचे जवळ संकल्पना मांडली आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून एक ग्रुप बनवून सर्वांशी संपर्क साधण्यात आला. 50 वर्षापूर्वी चांदे क्रिडांगणात खेळणारे विद्यार्थी आता आजोबाच्या भूमिकेत एकत्रित मिठया मारत जमले आणि गेट टुगेदरचा कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी शरद जोशी ,नंदू मेहता, नितीन दोशी, शेखर वाडकर, सुशील कडू निरंजन गुप्ते, कुमार मेहता, संतोष वारंगे माधव मुंदडा दिलीप देव दिपक देसाई, प्रशांत शेट, मारुती कदम, राजन आर्ते, सुधीर जाधव व अन्य मित्रांशी संपर्क साधण्यात यश मिळविले.
ग्रुपमध्ये नोंद झालेले एकूण मित्र 30 होते त्यापैकी 15 व्यापारी,11 अशासकीय सेवेत, 4 शासकीय सेवेत असे होते. बहुतांश मित्रांची मुले सुध्दा लंडन मिशिगन बेल्जियम, जर्मनी, दुबई, कुवेत .आफ्रिका आशा देशांतून नोकरी साठी आहेत. 5 दशकानंतर आमचे चेहरे एकमेकांसाठी अनोळखी झाले होते. पण मैत्रीची ओळख पक्की होती. वर्गातल्या गोष्टी काढल्यावर आठवणी डोळ्यासमोर तरळल्या. गुरुजनांच्या आठवणीने काहींच्या डोळ्यांच्या पापण्या नकळत ओलावल्या. सरतेशेवटी सहा महिन्यानी एकत्र भेटायचे हा ठराव करुन नव्या उत्साहान सारे घरी परतले.