| मुंबई | प्रतिनिधी |
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत 26.3 लाख अपात्र महिलांना तब्बल 5100 कोटी रुपये वितरित झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेने राज्यातील महिलांचे जीवनमान उंचावण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्येक पात्र महिलेने दरमहा 1500 रुपये मिळवण्याची ही योजना सत्ताधारी पक्षाच्या निवडणूक यशाचे प्रमुख कारण ठरली. परंतु, नुकत्याच झालेल्या तपासणीत योजनेतील गंभीर अनियमितता उघड झाल्या असून, यामुळे योजनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. योजनेतील अनियमिततेचा पर्दाफाशराज्याच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागाने केलेल्या तपासणीत 26.3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले. या महिलांना योजनेच्या सुरुवातीपासूनच दरमहा 1500 रुपये मिळत होते, ज्यामुळे आतापर्यंत सुमारे 15,128 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांवर खर्च झाले. ही रक्कम योजनेच्या चालू आर्थिक वर्षाच्या 10,000 कोटींच्या बजेटपेक्षा जास्त आहे. यामुळे योजनेच्या प्रारंभिक तपासणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.






