मंगळवारपर्यंत अहवाल सादर
करण्याचे एमआयडीसीला निर्देश
अलिबाग,प्रतिनिधी
शहापूर -धेरंड ता.अलिबाग येथे धरमतर खाडीच्या पश्चिमेस व गावांच्या पूर्वेस फुटलेला बांध बांधण्यासाठी आवश्यक असलेला पोहोच रस्ता तयार करण्यासाठी आवश्यक असणारे डीमार्केशन कार्यकारी अभियंता एमआयडीसी यांनी तयार करावे आणि त्याचा अहवाल 9 सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी रायगड यांना सदर करावा,असे निर्देश उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बेनाडे यांनी दिले आहेत.
फुटलेला बांध बांधण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून आंदोलन पुकारले होते.त्याची दखल घेत उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांनी मार्ग काढून प्रथम सर्वेक्षण करून शांतता व सुव्यवस्था आटोक्यात आणली. त्याच वेळेस डथ कंपनीस स्लक टाकण्यास विनंती केली होती. पोहोच रस्त्याचे अंदाजपत्रक बनवण्यासाठी तहसिलदार मीनल दळवी तीन बैठका घेतल्या, पण खारभूमी विभागानी अंदाजपत्रक बनवण्यास असमर्थता दाखवल्यामुळे पुन्हा हा प्रश्न वर्षभर प्रलंबित राहिला. त्याच वेळेस आम.जयंत पाटील यांचीही ग्रामस्थांनी भेट घेऊन पोहोच रस्त्यासाठी कंपनीची राख मिश्रीत माती देण्याची मागणी केली.त्यास आ.पाटील यांनी सकारात्मक पाठींबा दिला.
दरम्यानच्या काळात आणखी 18 ठिकाणी बांध फुटले. त्यामुळे प्रत्येक अमावस्या, पौर्णिमेला उधाणाचे पाणी गावातील घरापर्यंत पोचले.याच भागात एमआयडीसीचे संपादन असल्याने हा प्रश्न आणखीनच चिघळला.याबाबत एमआयडीसीचे सह.मुख्य कार्यकारी अधिकारी आणि श्रमिक मुक्तीदलाचे डॉ. भारत पाटणकर यांच्या समवेत बैठक होऊन पूर्व पश्चिम 5 किमी बांध व 2 उघाडी यांचे पूर्ण दुरुस्तीचे खर्चाचे अंदाजपत्रक खारभूमीने बनवून ते एमआयडीसीला 15 जून 22 पूर्वी सादर करण्याचे ठरले. त्या प्रमाणे 11.69 कोटीचे अंदाजपत्रक सादर झाले. परंतु या बांधावर पक्के मटेरियल नेण्यासाठी व गावात येणारे पाणी रोखण्यासाठी गावकर्यांना तातडीचा पोहोच रस्ता करण्याची मागणीची पूर्तता होत नव्हती. .शेवटी गावकर्यांनी 8 सप्टेंबर रोजी पाय दिंडी काढण्याचे आंदोलन जाहीर केले. त्याची दखल घेत जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी संपूर्ण पोहोच रस्त्याचे डीमार्केशन कार्यकारी अभियंता एमआयडीसी यांनी करून 9 सप्टेंबपपर्यंत अहवाल जिल्हाधिकारी यांना सदर करावा. त्याची एक प्रत सबंधीताना द्यावी, संपूर्ण पोहोच रस्त्यासाठी कंपनीने साहित्य पुरवावे. जेएसडब्ल्यू कंपनीने बांध दुरुस्तीसाठी देखील शक्यतो लालमाती मुरूम वापरावे. पोहोच रस्त्या पैकी165 जिताडा तलावांना एक पोहोच रस्ता हा पाणंद रस्ता योजने अंतर्गत कोणी करावा.असे निर्देश दिले.
या बैठकीला बैनाडे यांच्याशिवाय कार्यकारी अभियंता खारभूमी सावंत,प्रांत प्रशांत ढगे,तहसिलदार मीनल दळवी,एमआयडीसी उपअभियंता चव्हाण, जेएसडब्ल्यूचे कुमार थत्ते यांच्याशिवाय श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत, कांचन कोठेकर बबन म्हात्रे आदी उपस्थित होते.