। श्रीनगर । वृत्तसंस्था ।
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. अद्याप नवीन पार्टीचे नाव ठरवलेले नाही. मात्र, काश्मीरची जनताच पक्षाचे नाव आणि चिन्ह ठरवतील. मात्र, माझ्या पक्षाला हिंदुस्तानी नाव देणार. जे सर्व लोकांना समजेल, असं नाव ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
यावेळी आयोजित सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. मी नवा पक्ष काढणार असल्यामुळे अनेकजण संतप्त झाले आहेत. मात्र, मी कोणाचेही वाईट चिंतत नाही. आम्ही घाम गाळून काँग्रेस बनवली, उभी केली. त्यांची मजल केवळ कॉम्प्युटर आणि ट्वीटरपर्यंत आहे. ते लोक डिबेटमध्ये खूश आहेत. त्यांना ते लखलाभ असो. आम्हाला वृद्ध लोकं आणि शेतकर्यांसोबत रहायचं आहे, त्यांना त्यांची बादशाही मुबारक असे आझाद म्हणाले.