| मुंबई | प्रतिनिधी |
खरी शिवसेना कोणाची आहे. यावर मंगळवारी ( 27 सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावनी मेळाव्याच्या आधी असल्यामुळे शिवसैनिकांच्या नजरा न्यायालयाकडे लागून राहिल्या आहेत. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. मंगळवारी सुनावणीसाठी महाराष्ट्राचे प्रकरण दुसर्या क्रमांकावर आहे.
निवडणूक आयोगाची कार्यवाही चालू ठेवायची की नाही, याबाबत सुरुवातीला फैसला अपेक्षित आहे. 7 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश दिले होते. त्यामुळे सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालय महत्त्वाचे आदेश देण्याची शक्यता आहे.