| रायगड | प्रतिनिधी |
मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात पुढील 3-4 तास मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट पाहायला मिळेल.
सकाळी सात वाजता हवामान विभागाने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये पुढील तीन ते चार तास मध्यम स्वरुपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच, वारा 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील चार दिवस पावसाचे राहणार आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 24 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत पावसाची स्थिती कायम राहील. मुंबईमध्ये देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे.