चोप्राने रचला इतिहास

| मुंबई | वृत्तसंस्था |

अग्नी देव चोप्रा हा रणजी ट्रॉफीमध्ये मिझोरमकडून खेळत आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या पहिल्या चार सामन्यात शतक ठोकून इतिहास रचला. अग्नी चोप्रा हा भारताचा एकमेव फलंदाज आहे ज्याने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिल्या चार सामन्यात चार शतके ठोकली आहेत. अग्नी हा 25 वर्षाचा असून त्याने सलग चार शतके ठोकत भारतीय क्रिकेट वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्याने सिक्कीम, नागालँड, अरूणाचल प्रदेश आणि मेघालयविरूद्ध शतकी खेळी केली आहे. सिक्कीम विरूद्ध 166, नागालँडविरूद्ध 166, अरूणाचल प्रदेशविरूद्ध 114, मेघालयविरूद्ध 105 व 101 धावांची शतकी खेळी केली.

Exit mobile version