दोन,चार दिवसात अवकाळीची शक्यता
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले असून, येत्या काही दिवसात या कमी दाबाच्या क्षेत्राचं रुपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होऊन चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य दिशेला हे कमी दाबाचं क्षेत्र तयार होतय. आम्ही या स्थितीकडे लक्ष ठेऊन असल्याचं हवामान विभागाने म्हंटले आहे.
कमी दाबाचा क्षेत्र तीव्र होण्यास पोषक वातावरण दिसत असल्याचेही हवामान विभागाने म्हंटले आहे. मात्र याबद्दल आता अनुमान काढणं घाईचं होईल, असं हवामान विभागाच्या सायक्लोन डिपार्टमेंटच्या आनंद दास यांनी स्पष्ट केले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचं रुपांतर चक्रिवादळात होताना, अंदमान आणि निकोबार बेटावर 15 ते 19 मार्चदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, दक्षिण अंदमानच्या समुद्रात 19 मार्चला ताशी 40 -50 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या वर्षातील पहिले उष्णकंटीबंधीय चक्रिवादळाची निर्मिती बंगालच्या उपसागरात होण्याची शक्यता असल्याने अंदमान आणि निकोबार बेटावर 19 ते 20 मार्च दरम्यान मुसळधार पाऊस आणि जोरदार वार्यांमुळे नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.