भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

। वसई । प्रतिनिधी ।

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि. 19) सायंकाळी साडेपाचच्या सुमरास झाला.

सोमवारी (दि. 19) रक्षाबंधनाचा सण असल्याने प्रेमा उपाध्याय (62) या भावाला राखी बांधण्यासाठी त्यांचे पती रुपचंद उपाध्याय (67) यांच्यासह दुचाकीने विरारला जात होते. दरम्यान, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाच असताना रिलायबल सोसायटीसमोर एक भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की यात उपाध्याय दाम्पत्य रस्त्यावर फेकले गेले. यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रकाश रावत याला अटक केली आहे.

Exit mobile version