आ.जयंत पाटील विधानपरिषदेत कडाडले
| नागपूर | दिलीप जाधव |
अलिबाग तालुक्यातील मधील सांबरकुंड धरणग्रस्तांच्या घरावर बुलडोझर फिरविण्याच्या धमक्या देता मात्र याद राखा अजून मी जिवंत आहे तो पर्यंत धरणग्रस्तांच्या एकाही घराला धक्का लागू देणार नाही, असा सज्जड दम शेकाप आ.जयंत पाटील यांनी गुरुवारी विधानपरिषदेत दिला.
गुरुवारी (29 डिसेंबर) सभागृहात अलिबाग तालुक्यातील सांबरकुंड धरणग्रस्तांची व्यथा जयंत पाटील यांनी मांडली. ते म्हणाले की, लोकप्रतिनिधी अशा रीतीने धमक्या देत असेल तर सामान्य माणसाने न्याय कोणाकड़े मागायचा.सांबरकुंड धरणग्रस्तांचा प्रश्न अनेक वर्षा पासून प्रलंबित आहे.त्यांचे पुनर्वसन न झाल्यामुळे ते धरणग्रस्त झालेले आहेत. त्याच जागेवर आपला निवारा करित आहेत. सांबरकुंड धरणासाठी ज्यावेळी जागा संपादित केली त्यावेळी 1 हजार 600 रुपये प्रति गुंठा असा दर देण्यात आला. मात्र अलिबाग मधील जमीनीचा रेडीरेकनरचा दर गगनाला भिड़ले आहे.सध्या या परिसरात 50 हजार प्रति गुंठ्याचा भाव आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणले.
लोकप्रतिनिधी धरणग्रस्तांना जागा खाली करा, नाहीतर तुमच्या घरांवर बुलडोझर फिरवेन अशा धमक्या देतात, तर सामान्य जनतेने न्याय कोणाकड़े मागायचा हे सांगा. – आ.जयंत पाटील