| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
यंदा वेळेआधीच मान्सूम केरळध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान खात्याने ट्विट करत याची माहिती दिली आहे. दरम्यान, पुढील 48 तासांत मान्सून बंगालच्या उपसागरावर दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या बंगालच्या उपसागरात आलेले ङ्गअसनीफ हे चक्रीवादळ निवळत असून, नैऋत्य मोसमी वार्यांसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे विनाअडथळा मान्सून दाखल होणार आहे.
दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरावर 15 मे रोजी मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान अगोदर येण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे राज्यातील विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये असलेली उष्णतेची लाट पुढचे दोन तीन दिवस कायम राहणार आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मान्सून पुढील दोन दिवसांत अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
दरवर्षी मान्सून अंदमानात 18 ते 20 मेच्या दरम्यान दाखल होतो. मात्र अनुकूल स्थितीमुळे तो पाच दिवस अगोदर येण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांत मान्सून अंदमान-निकोबार बेटांचे संपूर्ण क्षेत्र, अंदमानचा समुद्र आणि मध्य-पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भाग व्यापेल, अशीही माहिती मिळत आहे. त्यामुळे यंदा केरळातही वेळेआधी मान्सून दाखल होणार असल्याने शेतकर्यांसाठी ही खूशखबर आहे.