| तळा | वार्ताहर |
जी.एम.वेदक कॉलेज ऑफ सायन्सच्या राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराचे उद्घाटन तहसीलदार स्वाती पाटील याच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्र उद्धारासाठी ग्राम उद्धार महत्त्वाचा आहे, त्यामुळे हे राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिर ग्रामीण भागात घेतले जाते. ग्रामीण जीवन विद्यार्थ्यांना समजले पाहिजे येथील दैनिक व्यवहार, राहणीमान, त्यांची सुखदुःख, सामाजिक ऐक्य, समाज जीवनाचा मानवावर होणारा परिणाम या सर्व गोष्टी अवगत होण्यासाठी हे शिबिर महत्त्वाचे आहे, असे तळा तहसीलदार स्वाती पाटील यांनी शिबिराचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. या शिबिरात वनसंरक्षण व वन संवर्धन विषयावर व्याख्यान, किशोर शितोळे यांची पथनाट्यातून जनजागृती, ऋतुजा रायकर यांचे शांतमन, आनंदी जीवन विषयावर व्याख्यान एसबीआय बँक मॅनेजर किशोर धुमे यांचे शैक्षणिक कर्ज व बँकेचे व्यवहार विषयावर व्यख्यान, प्रा. डॉक्टर श्रीकृष्ण तुपारे यांचे दैनिक जीवनातील स्वच्छतेचे महत्व या विषयावर व्याख्यान होणार आहेत.
कार्यक्रमास सुचित पतारे, हरिश्चंद्र तांबे, सायली घाग, दिलीप पांचाळ, प्रा. डॉ. विजय सरोदे, सचिन पात्रे, सतीश शेपोंडे, दत्तात्रेय काप, दिनेश काप, नामदेव काप, दर्शना घागरुम, सुभा काप, योगिता पतारे, दिशा काप, बाजी काप, राजेश काप, विठोबा काप, लक्ष्मण शिंदे शंकर शेपोंडे, प्रचिन मसाल, नारायण पतारे, स्नेहा पतारे, सुरेखा तांबे, प्रणाली पांचाळ, भगवान खंबाळ, ग्रामस्थ व महिला मंडळ, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ.एन एम शेख यांनी केले, तर आभार प्रा.डॉ. विवेक राणे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन बंगाळे यांनी केले.