टोमॅटोच्या दरात वाढ

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

गेल्या चार ते पाच महिन्यापासून स्थिर असलेले टोमॅटोच्या दराने उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारात टोमॅटोचे दर वधारले आहेत. परराज्यातून आणि महाराष्टातुन होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचे भाव वाढले असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे दरवाढ झालेली आहे. मागील आठवड्यात 2 हजार क्विंटलहुन अधिक टोमॅटो दाखल होत होते. ते आता 1 हजार 800 क्विंटल दाखल होत आहेत. पावसामुळे उत्पादन खराब होते तसेच शेताततून उत्पादन घेण्यास अडचणी येत आहेत, त्यामुळे बाजारात आवक कमी झाली आहे. महाराष्ट्रतुन सातारा, सांगली आणि संगमनेर तर बंगळूरमधून टोमॅटो दाखल होतात. मागील वर्षी जुलैमध्ये टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला होता. किरकोळ बाजारात 150 ते 180 रुपयांवर तर घाऊक बाजारात 100 ते 110 रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र ऑगस्टनंतर टोमॅटोचे दर उतरले होते. ते आतापर्यंत टोमॅटोचे दर आवाक्यात होते. मात्र आता पुन्हा टोमॅटोच्या दाराने उसळी घेतली असून घाऊक बाजारात प्रतिकिलो 28 ते 32 रुपये तर किरकोळ बाजारात 80 रुपयांनी विक्री होत आहेत.

Exit mobile version