खाडीकिनारी जल प्रदूषणात वाढ

मासेमारी करणाऱ्या व्यवसायिकांना फटका

| उरण | प्रतिनिधी |

पनवेलच्या विविध खाड्या, किनारपट्टीवरील जलप्रदूषण वाढले आहे. तर दुसरीकडे मातीचा भराव करून खाडीमुख बुजविण्यात येत आहेत. खाडीतील वाढते जलप्रदूषण आणि भराव यामुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या विविध माश्यांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांना याचा आर्थिक फटका बसला आहे. या मत्स्य दुष्काळाने पारंपरिक मासेमारी करणाऱ्या व्यवसायिकांवय उपासमारीची वेळ आली आहे.

जेएनपीए बंदर व नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून उरण पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यात काही भांडवलदारांनी आपला व्यवसाय उरण पनवेल खाडीकिनाऱ्या लगत असलेल्या शेतजमिनीवर सुरू केला आहे. अशा खाडीकिनाऱ्या वरील शेतजमिनीवर दगड-मातीचा भराव टाकला जात आहे. भरावात खारफुटीचे जंगल तसेच पाणलोट क्षेत्रही बुजविले जात आहे. खाडीतील वाढते जलप्रदूषण आणि भरावामुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या विविध माश्यांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांची चिंता वाढली आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी सदर बाबींकडे लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी पारंपरिक मासेमारी करणारे व्यावसायिक करत आहेत.

Exit mobile version