खो-खो मध्ये भारताला अजिंक्यपद

रायगडच्या सुपुत्रावर नेतृत्वाची धुरा

| पाली | वार्ताहर |
भारताच्या पुरुष संघाने चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा 38-32 आणि एक डाव व 6 गुणांनी पराभव केला. यामध्ये भारताचा कर्णधार सुधागडाचा सुपुत्र अक्षय भांगरे याने 1,1 मी. संरक्षण व 4 गुण, अनिकेत पोटे 6 गुण, अक्षय गणपुळे 1.20 मी संरक्षण, अमित 1.10, 1.10 मी संरक्षण व 2 गुण अशी नेत्रदीपक कामगिरी करत भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Exit mobile version