। अगरतळा । वृत्तसंस्था ।
दारु समजून सिड प्यायल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्रिपुरातील धलाई जिल्ह्यात ही घटना समोर आली असून बुधवारी याबाबत पोलिसांनी माहिती दिली. धलाई जिल्ह्यातील मानु पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मृत्यू झालेल्या तिघांची ओळख पटली असून सचिंद्र रियांग (वय-22), अधिराम रियांग (वय-38) आणि भाबीराम रियांग अशी त्यांची नाव आहेत.
उपविभागीय पोलिस अधिकारी रत्न साधन जमाटीया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री कंचनचर्रा परिसरात एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी आलेल्या सर्वांनी बर्याच मोठ्या प्रमाणावर दारु प्यायली होती. यानंतर त्याच नशेत त्यातील तिघांनी रबर मॅट बनवण्यासाठी ठेवलेल्या सिडचे दारु समजून सेवन केले.