। उरण । वार्ताहर ।
जे.एन.पी.टी. बंदर ते मुंबई दरम्यानची जलसेवा शनिवारपासून (दि.1) पुन्हा एकदा जे.एन.पी.टी. ते गेट वे ऑफ इंडिया अशी सुरू होणार आहे. त्यामुळे उरणमधील प्रवाशांना विना अडथळा तासाभरात जे.एन.पी.टी.वरून थेट दक्षिण मुंबईत पोहचता येणार आहे.
उरणमधून मोरा ते भाऊचा धक्का व जे.एन.पी.टी. बंदर ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावर जलसेवा सुरू आहे. या दोन्ही जलसेवा बारमाही सुरू असतात. मात्र, पावसाळ्यात चार महिन्यासाठी यातील जे.एन.पी.टी. ते गेट वे ही सेवा जे.एन.पी.टी. ते भाऊचा धक्का अशी जलसेवा सुरू होती. ती शनिवारपासून पुन्हा एकदा भाऊच्या धक्क्याऐवजी गेट वे ऑफ इंडिया अशी सुरू करण्यात येणार आहे.
जे.एन.पी.टी. – गेट वे लाँच सुरु होणार
![](https://krushival.in/grygrars/2022/09/BOAT-1-1024x569.jpg)