जयराम पाटील यांचे निधन

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते जयराम पाटील यांचे शुक्रवारी (दि. 26) वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी ते 85 वर्षे होते. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

जयराम महादेव पाटील हे अलिबाग तालुक्यातील लेभी-कोपर येथील रहिवासी आहेत. गेल्या 50 वर्षांपासून ते शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते होते. राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ते ग्रामपंचायतीचे सरपंच होते. सरपंच असताना गावाच्या विकासासाठी वेगवेगळे निर्णय घेतले. शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा गावासह परिसरात फडकविण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले. पक्षाची ध्येय धोरणे तरुणांपर्यत पोहोचवून पक्षवाढीसाठी त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे एक सच्चा कार्यकर्ता हरपला, अशी प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचेही निधन झाले आहे.

Exit mobile version