| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कावाडे येथील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राघव जवरू पाटील यांचे दिनांक २५ मार्च २०२२ रोजी ७८ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. ते शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. गेली २५ वर्ष त्यांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचे रेवस ग्रामपंचायतचे सरपंच पद उपसरपंच पद व सदस्य पद आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व तीन मुली नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी कावाडे येथे आहे व तेरावे ५ एप्रिल २०२२ रोजी होणार आहे.