| अलिबाग | प्रतिनिधी |
तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायतीमध्ये प्रचाराचा चांगलाच झंझावत सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शेकाप यांनी वाडगाव विकास आघाडी केली आहे. जनतेला परिवर्त पाहीजे आहे. त्यामुळे ते आम्हालाच मतदान करणार असल्याने विजय आमचाच होणार आहे, असा विश्वास थेट सरपंचपदाच्या उमेदवार मनिषा नाईक यांनी व्यक्त केला.
वाडगाव ग्रामपंचायतीमधील झालेला भ्रष्टाचार आम्ही जनतेसमोर मांडत आहोत. गेल्या दहा वर्षात सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या पैशाची लुट केली आहे. हे आम्ही कागदपत्रांच्या आधारे जनतेला सांगत आहोत. जी कामे केली नाहीत, त्यावर लाखो रुपयांची बिले काढण्यात आली आहेत. हे जनतेला समजल्यावर जनतेमध्ये प्रचंड चिड असल्याचे दिसून आले. सत्ताधाऱ्यांना जनताच धडा शिकवणार असल्याने विजय वाडगाव विकास आघाडीचा निश्चित मानला जात आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत आमचे उमेदवार, पदाधिकारी कार्यकर्ते हे जनतेमध्ये जात आहेत. आम्ही थेट कोणावरही टीका करत नाही मात्र सत्ताधाऱ्यांनी केलेले प्रताप हे उघड करत आहोत.
वाडगावमध्ये पाणीपट्टीच्या माध्यमातून चांगलीच लुट केली जात आहे. पाणीपट्टीची रक्कम वाढवल्याने घरटी किमान पाचशे ते सहाशे रुपयांचे बिल येत आहे. शेजारी असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये महिना 60 रुपयांचे बिल जनतेला येते, मग वाडगावमध्येच जादा का असा सवाल विचारला जात आहे, असे ऋषीकांत भगत यांनी सांगितले. दहा वर्षापूवी नळ योजना सुरु केली होती. त्यावेळी नळ जोडणी घेणाऱ्यांची संख्या कमी असल्याने पाणीपट्टीचा दर 15 रुपये प्रति युनीट केला होता, मात्र जशी नळजोडणीची संख्या वाढेल त्यानुसार पाणीपट्टी कमी करण्याचा ठराव मी सत्तेत असताना घेतला होता, असेही ऋषीकांत भगत यांनी सांगितले.
गावातील डोंगर पोखरुन माती, दगड यांची लुट करण्यात येत होती. त्यावेळी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी विधान परिषदेत आवाज उठवला होता. त्यानंतर बेकायदा उत्खनन बंद करावे लागले होते, असे शेकापचे प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले. बेकायदा उत्खनन बंद केले नसते, तर फार मोठी दुर्घटना झाली असती असेही ते म्हणाले. जनता सत्ताधाऱ्यांवर प्रचंड नाराज आहे. तजनतेला परिवर्तन पाहीजे असल्याने वाडगाव विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना ते निवडून देतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.