। मुंबई । भगूर ।
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 139 वी जयंती त्यांच्या जन्मस्थानी भगूर या गावात मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. भगूरमध्ये असलेल्या त्यांच्या जन्मठिकाणी स्मारक असलेल्या सावरकरवाड्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने तयार केलेल्या ङ्गसावरकरांच्या समाजक्रांतिची यशोगाथाफ या विशेष माहितीपटाचे प्रकाशन – लोकार्पण करण्यात आले. सर्वप्रथम राज्याच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्याहस्ते वाड्यातील सावरकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली.
पत्रकार प्रशांत धिवनदे यांच्या सावरकर आणि भारतरत्न या काव्य फलकाचे प्रकाशन आणि श्रीराम कातकाडे यांनी संपादित केलेल्या मी सावरकर मी भगूरकर या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. सुरुवातीला श्रुती करंजकर या लहान मुलीने सावरकरांच्या जीवनावरील आठवणी आपल्या विचारातून ताज्या करण्याचा प्रयत्न केला.
या प्रसंगी कारगिल युद्धातील मेजर दीपचंद, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय तथा आप्पा करंजकर, स्मारकाचे सदस्य शैलेंद्र चिखलकर, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या नाशिक विभागाच्या सहाय्यक संचालिका सौ. आरती आळेे आदी उपस्थित होते. या प्रसंगी दरवर्षी सावरकर स्मारकाची चांगल्या पद्धतीने देखरेख करणार्या बायजा बाईचा विशेष सन्मानही या ठिकाणी ते डॉक्टर तेजस गर्गे यांच्या हस्ते करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भगूर येथील सावरकरवाड्याच्या देखभालीचे व्यवस्थापन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने केले जाते.
माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार शिवसेना नेते अरविंद सावंत यांनीही भगूर येथील स्मारकाला भेट देऊन सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.