| नवेखेड | वार्ताहर |
भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा, या मागणीसाठी भारताच्या सुवर्णकन्या आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा राज्यसभा खासदार पी.टी. उषा यांची कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या वतीने भेट घेतली. 1952 मध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांना आजपर्यंत पद्म पुरस्कार दिला गेला नाही, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांना कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे निवेदन देण्यात आले. पी.टी. उषा यांनी सर्व गोष्टीचा जरूर विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव, कुस्ती मल्लविद्या महासंघाचे मुख्य प्रवक्ता संग्राम कांबळे, एस. पी. फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील, उमेश माने, राकेश मोरे, सर्वेश केडिया आदी उपस्थित होते.