• Login
Thursday, March 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

सेवेची आठवण

Varsha Mehata by Varsha Mehata
October 24, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मोबाईल सेवेमध्ये बीएसएनएल ही सरकारी कंपनी फार पूर्वीच मागे पडली. आता रिलायन्सने लॅँडलाईन सेवेमधले तिचे पुढारपणही हिरावून घेतले आहे. ऑगस्ट महिन्यात रिलायन्स जिओ सेवेच्या लॅँडलाईन ग्राहकांची संख्या 73 लाखांवर गेली. बीएसएनएलची ग्राहकसंख्या 71 लाख आहे. देशात लॅँडलाईन सेवा घेणारे सुमारे दोन कोटी साठ लाख ग्राहक आहेत. त्यापैकी साधारण बावीस टक्के आता जिओच्या कब्जात आले आहेत. मोबाईलच्या आगमनानंतर लँडलाईनचे महत्व संपले. देशात सध्या सुमारे एकशेसतरा कोटी फोन कनेक्शन्स आहेत. त्यातील 98 टक्के मोबाईल फोन असून केवळ दोन टक्के लॅँडलाईन्स आहेत. एकेकाळी ग्रामीण भागातील मोबाईल फोनच्या बाजारपेठेवर बीएसएनएलचा एकाधिकार होता. लँडलाईन फोनसाठीच्या जाळ्यामुळे त्या कंपनीकडे खेड्यापाड्यात पोचेल अशी यंत्रणा होतीच. टॉवर्सही होते. शिवाय खासगी कंपन्या मुंबई-दिल्ली किंवा अशाच शहरांवर लक्ष केंद्रीत करू पाहत होत्या. बाहेर विस्तार करण्यासाठी फायबर लाईनचे जाळे टाकणे किंवा टॉवर्स उभारणे याला मोठा भांडवली खर्च लागणार होता. तो करण्याची त्यांची तयारी नव्हती. त्यामुळे आपल्याला कोणीही धक्का लावू शकत नाही अशा धुंदीत बीएसएनएलवाले होते. पण त्याच वेळी रिलायन्सने ही संधी हेरली. ग्रामीण बाजारपेठेचं महत्व कळतं तीच कंपनी या देशातील स्पर्धेमध्ये मुसंडी मारू शकते हा पूर्वापारचा इतिहास आहे. एकेकाळी हिंदुस्थान लिव्हरसारख्या किंवा टाटा यासारख्या कंपन्यांनी हे महत्व ओळखून खेड्यापाड्यातील किराणा दुकानांपर्यंत आपला माल पोचवणारी यंत्रणा उभी केली. त्यामुळे बाजारपेठेत त्यांचा वरचष्मा होता. इतर कंपन्यांना हे कळेपर्यंत बराच वेळ गेला. फोन सेवेबाबतही बड्या कंपन्यांची गफलत झाली. फोन फक्त शहरी लोक वापरतील किंवा त्यांनाच परवडू शकेल असे गृहित धरले गेले. शहरांमध्येही श्रीमंत किंवा मध्यमवर्गीयांनाच केवळ ग्राहक मानले गेले. आज देशातील 117 कोटी फोन कनेक्शन्सपैकी 65 कोटी शहरांमध्ये तर उर्वरित 52 कोटी ग्रामीण भागातील आहेत. शहरी भागातही सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, गवंडी, छोटे व्यावसायिक वा फेरीवाले, दुकानदार इत्यादी लोकांना मोबाईल सेवेचा मोठा फायदा झाला. खेड्यापाड्यातील दूरदूरची अंतरं हा मोठा अडसर होता. त्यावर फोनमुळे मात करता आली. शेतकरी, छोटे व्यापारीच नव्हे तर शेतमजुरांना त्याचा फायदा झाला. बीएसएनएलकडे आरंभी हे ग्राहक मोठ्या प्रमाणात होते. त्यांना बांधून ठेवणारी उत्तम सेवा दिली असती तर आजही ती क्रमांक एकची कंपनी असती. पण स्वतःच्या हाताने पायावर कुर्‍हाड मारून घेतली. रिलायन्स कंपनीला दोन गोष्टी तिला अनुकूल होत्या. देशभर फायबर लाईन टाकण्यासाठी जो अमाप पैसा लागणार होता तो पेट्रोलियम रिफायनरीमधून मिळत होता. दुसरे म्हणजे कंपनीला हवी तशी सरकारी धोरणे वाकवून देण्यासाठी अधिकारी व मंत्री तयार होते. एकेकाळी काँग्रेस तो अपनी दुकान है असे मुकेश अंबानी यांनी म्हटल्याचे बोलले जात असे. पण 2014 मध्ये भाजपचे सरकार आले म्हणून रिलायन्सच्या रथाला काही अडथळा आला असे नव्हे. किंबहुना, सरकार कोणाचेही आले तरी रिलायन्सचे मांजर नेहमी चार पायावरच पडते हा सार्वत्रिक अनुभव आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की, एका खासगी कंपनीसाठी गोष्टी अनुकूल करताना बीएसएनएलचा गळा पद्धतशीरपणे आवळण्यात आला. तिच्यातील गुंतवणूक रोखण्यात आली. वेळेवर नवीन तंत्रज्ञान घेतले गेले नाही. जिओने अधिकार्‍यांची फोडाफोडी केली तीही सहन केली गेली. टॉवरमधील बिघाड तात्काळ दूर व्हावा किंवा सिग्नलबाबतच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहावे अशा साध्या गोष्टीही केल्या गेल्या नाहीत. एकूण, रिलायन्सला मदत करण्यासाठीच केले गेले की काय अशी शंका यावी या रीतीने घडले. आज बीएसएनएल आणि एमटीएनचा बाजारपेठेतील हिस्सा जेमतेम नऊ टक्के आहे. सर्व देशात फाईव्ह जीची चर्चा चालू असताना बीएसएनएलवाले फोरजी सेवा देण्याबाबत पुढच्या वर्षीचे वायदे करीत आहेत. पूर्वी उत्तम चाललेली ही सरकारी कंपनी आज मरणाच्या दारात आहे आणि त्याबद्दल दुखवटा करायलाही कोणाला सवड नाही. हे असं का झालं याचं उत्तर स्वतःच्या कार्यक्षमतेचे ढोल पिटणार्‍या मोदी सरकारनं द्यायला हवं. 

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

शिंदे गटाचे 22 आमदार भाजपत जाणार? ठाकरे गटाचा दावा

Next Post

भूक निर्देशांकावरून एवढा गहजब का?

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post

भूक निर्देशांकावरून एवढा गहजब का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?