पावसामुळे जनजीवन विस्कळीत

663 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

अलिबाग  | प्रतिनिधी |

जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 198 घरांसह 8 पोल्ट्रीची पडझड झाली असून, 766 जणांना पुरासह दरडीच्या भीतीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. इर्शाळवाडीत शोधकार्य पुन्हा सुरु केले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामध्ये रोहामधील कुंडलिका, अंबा, महाडमधील सावित्री, पनवेलमधील पाताळगंगा, कर्जतमधील उल्हास व पनवेलमधील गाढी पाण्याने भरल्या असून, जिल्ह्यातील 28 धरणांपैकी 18 धरणे फुल्ल झाले आहेत. नदी, धरणाजवळील दरडग्रस्त गावांमधील 766 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यात मुुरुडमधील राजपुरी येथील दरडग्रस्त गावांतील 40, महाडमधील पूरग्रस्त व दरडग्रस्त गावांमधील 255, पोलादपूरमधील 72, पेणमधील 20, माणगावधील 83, पनवेलमधील 24, खालापूरमधील 104, अलिबागमधील 128 जणांना स्थलांतरित केले आहे. काहींना त्यांच्या नातेवाईकांकडे, तर काहींना समाजमंदिर, जिल्हा परिषद शाळा व प्रशासनाने तयार केलेल्या कॅम्पमध्ये स्थलांतरित केले आहे.

या पावसामध्ये 198 घरांसह 6 पोल्ट्रीची पडझड झाल्याने नुकसान झाले आहे. तसेच म्हसळा, तळा, महाड  व पेणमधील समाज मंदिरसह अंगणवाडीदेखील पडझड झाली आहे.
या पावसात इर्शाळवाडीमध्ये कोसळलेल्या दरडीत सापडलेल्या 228 लोकांपैकी 16 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 109 जणांचा एनडीआरएफ दलामार्फत शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजल्यापासून शोध सुरु करण्यात आला पाऊस असल्याने दरडीत सापलेल्यांना शोधताना यंत्रणेची तारांबळ उडाली, तरीदेखील भरपावसात जीवाची बाजी लावत ही यंत्रणा काम करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Exit mobile version