। मुंबई । प्रतिनिधी ।
एकीकडे उन्हाचा तडाखा अनुभवताना पावसाचे संकटही राज्यावर असणार आहे. मुंबईतील तापमानात वाढ होत आहे. मुंबईतील काही भागांमध्ये हलक्या सरी कोसळण्याच्या अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि अहिल्यानगरमध्येदेखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.