। सोलापूर । प्रतिनिधी ।
सोलापूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका अज्ञाताने चालत्या रेल्वेवर भिरकावलेल्या दगडामुळे पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना विजयपूर-रायचूर पॅसेंजर एक्सप्रेसमध्ये घडली असून आरोही अजित कांगले असे 5 वर्षीय मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. कुलदैवताच्या यात्रेवरून सोलापूरला परतत असताना ही घटना घडली आहे.
या चिमुकलीचे पालक विजयपूर ते रायचूर पॅसेंजर एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. त्याचवेळी एका अनोळखी व्यक्तीने चालत्या रेल्वेवर एक दगड भिरकावला. यात आरोही गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी सोलापूर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला.