लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होणार

आरोग्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य
। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र राज्यात अनेक ठीकाणी आजही निर्बंध कायम आहेत. मुंबईतील लोकल कधी सुरू होणार, तसेच राज्यात अनलॉक कधी होणार, अशा अनेक मुद्द्यांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे. दिलासादायक म्हणजे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल करण्याची गरज असल्याचे राजेश टोपे म्हणाले.

राजेश टोपे म्हणाले, पहिला रुग्ण आढळल्यापासून काही नियम आखून दिले आहेत. त्या नियमानुसारच महाराष्ट्र काम करत आहे. खउचठ ने सिरो सर्व्हे केला आहे. त्यानुसार त्यांनी आम्हाला सांगावे, प्रोटोकॉल द्यावा. कशाप्रकारे निर्बंधामध्ये सुट देता येईल, या संदर्भात सुचना द्याव्यात. कारण आताच केंद्राची टिम येऊन गेली त्यांनी निर्बंध पाळणे, टेस्टींग वाढवणे, अशा सुचना दिल्या आहेत. आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नियम पाळत आहोत. खउचठ ने मार्गदर्शन केल्यास आम्हाला निर्णय घेता येईल.

लसीकरणाचा वेग वाढवावा
महिने दोन महिन्यात राज्याचे लसीकरण 100 टक्के पुर्ण करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. पण त्या गतीनं लस उपलब्ध व्हायला हवी. केंद्राने लसीकरणाला वेग देण्यासाठी मदत करायला हवी. जर 60 ते 70 टक्के लसीकरण झाले. तर सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. ती या महामारीमध्ये गरजेची असल्याचे टोपे म्हणाले.

तिसरी लाट येऊ शकते पण ते कधी येईल, हे आपल्यावर आहे. जर आपण कोरोनाचे नियम व्यवस्थित पाळले तर आपल्याला कोरोनाची तिसरी लाट थोपवता येऊ शकेल. तसेच यावर लसीकरण सुद्धा रामबाण उपाय आहे.


राजेश टोपे आरोग्यमंत्री

ज्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेले आहेत अशा नागरिकांना टप्याटप्प्याने बाहेर फिरण्याची मुभा देण्याचा विचार आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे,

अजित पवार,उपमुख्यमंत्री



Exit mobile version