‌‘भगवान गौतम बुद्ध शांतीचे प्रतीक’

आगरदांडा | प्रतिनिधी |

भगवान गौतम बुद्धांनी आपल्या महान विचारांनी आणि शिकवणीने जगाला एक नवीन मार्ग दाखवला. समाजाला अभूतपूर्व बदल घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे भगवान गौतम बुद्ध हे शांतीचे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन वावडुंगी सरपंच ऋतुजा वरणकर यांनी केले. त्या भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या वेळी बोलत होत्या.
यावेळी ऋतुजा वरणकर यांच्याकडून अडीच फूट उंचीची भगवान गौतम बुद्धांची मूर्ती सायगाव येथील विहाराला येथे भेट देण्यात आली. यावेळी सायगाव गाव अध्यक्ष मंगेश मोरे, माजी सरपंच जिविन मोरे, मुंबई अध्यक्ष प्रमोद मोरे, भालचंद्र मोरे, गौतमी मोरे, मुंबई नगरसेविका उर्मिला पांचाळ, पांडुरंग जाधव, गौतम मोरे, दिपेश वरणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version