| मुंबई | वृत्तसंस्था |
अर्थमंत्री अजित पवारांकडून अंतरिम अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात झाली आहे. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनाही अभिवादन केले. 11 गड किल्ल्यांना जागतिक वारसा मिळण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली आहे. राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्याला ८ हजार कोटींचा जीएसटी परतावा मिळाला आहे, असं त्यांनी सांगितलं.
अजित पवारांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे ग्रामीण भागात 1 कोटी 48 लाख नळ जोडणार, 1 लाख रोजगार, 20 हजार कोटींची गुंतवणूक, नवी मुंबई विमानतळ वर्षभरात उभे राहणार, लघु उद्योग संकुलामधून रोजगार निर्मिती होणार, मूर्तीजापूर-यवतमाळसाठी 50 टक्के निधी, ईस्टर्न फ्रीवेचा विस्तार ठाण्यापर्यंत, राज्यात 18 वस्त्रोद्योग उभारले जाणार, वरळी- नरिमन पॉईंट कोस्टल रोड अंतिम टप्प्यात आहे, राज्यात सहा वंदे भारत एक्स्रेस सुरु आहेत, नियोजित रस्त्यांसाठी 6 हजार कोटींचा प्रस्ताव आहे, 19 हजार 900 कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत, नगर विकास विभागासाठी 9 हजार कोटींचा निधी, फलटण ते पंढरपूर महामार्गाला मान्यता, शकुंतला रेल्वेसाठी 50 टक्के मदत करण्यात आलीये, नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचं भूसंपादन प्रक्रिया सुरुय, रेडियो क्लब इथं जेटींसाठी बंदर बांधण्याचं काम हाती घेतलंय, नगर विकास सेठी 10 हजार कोटी तर सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी 19 हजार कोटी रुपये देणार 1 ट्रिलीयन डाॅलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरु आहे, वर्सोवा वांद्रे सागरी सेतू पालघर पर्यंत केला जाणार आहे, सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आणखी सुरु करणार, रेडीओ क्लब जेटीसाठी 227 कोटी रुपयांच्या काम सुरु होणार आहे, मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.