दंगलीच्या आडून महाराष्ट्राची लूट- हर्षवर्धन सपकाळ

। नागपुर । प्रतिनिधी ।

नागपुरात झालेल्या हिंसाचारावेळी मुख्यमंत्री पोलिसांना फोन करत होते. परंतु, पोलीस फोन उचलत नव्हते असे भाजपा आमदार सांगत होते. त्यातून दंगलीचे प्रायोजक कोण होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. राज्य टिकण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत व या दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटला जात आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नागपुरात केला आहे. ते पुढे बोलताना म्हटले की, उद्योगपतींना जमिनी दिल्या जात आहेत. आपल्याला एकजुटतेने सद्भावनेच्या मार्गाने जावे लागणार आहे. संविधानाचा, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे आणि राहुल गांधी यांचे ‘मोहब्बत की दुकान’ उघडायचे आहे. सत्तेसाठी काही लोक भावाभावात, जातीपातीत भांडणे लावत आहेत. सत्तेसाठी अशांतता पसरवणार्‍यांनी जाती धर्मात, भावा भावात भांडणे लावू नये, असे आवाहन देखील सपकाळ यांनी केले आहे.

Exit mobile version