महाराष्ट्राचे आवाहन संपुष्टात

| पुणे | वृत्तसंस्था

विदर्भाच्या क्रिकेट संघाने सोमवारी रणजी क्रिकेट करंडकातील एलिट ‘अ’ गटातील लढतीत महाराष्ट्रावर 10 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला आणि 27 गुणांसह उपांत्यपूर्व फेरीत पाऊल ठेवण्याच्या दिशेने पाऊल टाकले. महाराष्ट्राला 11 गुणांवरच समाधान मानावे लागले असून त्यांचे या स्पर्धेतील आवाहन संपुष्टात आले आहे. महाराष्ट्राकडून विदर्भासमोर फक्त 28 धावांचे आव्हान उभे ठाकले. अथर्व तायडे व ध्रुव शोरी या सलामीवीरांनी एकही विकेट न गमावता विदर्भाला विजय मिळवून दिला.

Exit mobile version