। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
माणुसकी प्रतिष्ठान सामाजिक संस्था जित नगर थळ या संस्थेला 10 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. संस्थेचा प्रथम वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला, वर्धापन दिन साजरा करत असताना स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सव निमित्ताने सामाजिक कार्य रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा परिषद, माणुसकी प्रतिष्ठान, पंचायत समिती अलिबाग, दत्त प्रासादिक माथाडी संतसेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दत्त टेकडी थळ वायशेत येथे पार पडले. यामध्ये 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले, माणुसकी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रम ची सुरुवात झाली. रायगड जिल्हा परिषद जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, संवाद तज्ञ सुरेश पाटील, थळ ग्रामपंचायतचे सरपंच सुनील पत्रे, माणुसकी प्रतिष्ठान सांगोला तालुका अध्यक्ष अतुल कावळे, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी मदत करणारे खोपोली ग्रुप चे अध्यक्ष गुरुनाथ साटेलकर कु भक्ती साठेलकर, दिव्यांग संघटना महाराष्ट्र चे अध्यक्ष, साईनाथ पवार, सेवानिवृत्त धर्मादाय अधीक्षक विठ्ठल ठोंबरे, दत्त प्रासादिक माथाडी संतसेवा मंडळ अध्यक्ष अमोल भोईटे महाराज, माणूसकी प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान, उपाध्यक्ष सतीश कणसे, खजिनदार संतोष कणसे,कार्याध्यक्ष तानाजी आगलावे,सदस्य कृष्णा वाघमारे, भूषण जंजिरकर व संपूर्ण माणुसकी टीम तसेच इतर सामाजिक संस्था सदस्य उपस्थित होते, या कार्यक्रमात माणुसकी टीम सोबत वर्षभर काम करणारे संस्था तसेच सामाजिक कार्यकर्ते व रायगड जिल्ह्यामध्ये विविध कला, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे सर्व सदस्यांचे माणुसकी सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, गायक रोहित पाटील यांनी माणुसकी प्रतिष्ठान चे गीत स्वतः लिहून संगीतबद्ध करून गायिले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांनी माणुसकीच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक करून पुढील वाटचालीस मार्गदर्शन पर शुभेच्छा दिल्या आणि माणुसकी सोबत केलेल्या कामाच्या आठवणीना उजाळा दिला मी स्वतः माणुसकी सदस्य आहे असे गौरोउद्गार काढले. जयवंत गायकवाड यांनी संपूर्ण येणारे वर्षभर नियोजन बद्ध सामाजिक कार्य कसे करायचे या बद्दल सर्व संस्थेना मार्गदर्शन केले. माणुसकी टीम वर्ष भर केलेले कार्य डॉ राजाराम हुलवान यांनी सांगितले, सदर कार्यक्रम साठी सुरभी फाउंडेशन च्या सौ सुप्रिया जेधे यांनी मास्क चे वाटप केले. आशिष कडू यांनी 50 तुळशी वृक्ष, चाफा भेट दिले. श्री दत्त प्रासादिक माथाडी मंडळ यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. आभार प्रदर्शन तानाजी आगलावे यांनी केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र केळुसकर यांनी उत्तम रित्या पार पाडले.