। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
संजय गांधी निराधार योजनेचे तीन महिन्यांपासून पैसे लाभार्थ्यांना मिळाले नसल्याने शेकापनेते पंडित पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. एक तारीख झाली की आमदारांना पगार मिळतो सरकारी कर्मचार्यांना 10 तारखेच्या आत पगार मिळते मग संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वेळेवर का दिले जात नाही असा सवाल शेकापक्षाचे नेते पंडित पाटील यांनी करीत या योजनेचे पैसे लाभार्थ्यांना दरमहा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत माहिती देताना पंडित पाटील म्हणाले की, बॅ अ. र. अंतुले मुख्यमंत्री असताना निराधार महिलांसाठी यांनी संजय गांधी निराधार योजनेचे ही योजना सुरु केली. गरीब निराधार महिलांना खर्या अर्थाने आधार देण्याचे कार्य केले. कोरोना महामारीमुळे गोरगरीब त्रस्त झालेत त्यांच्यावर उपासमार ओढवली आहे. असे असताना राज्य सरकारने तीन महिने पैसे प्रलंबित ठेवण्याचे कारण काय? ज्याप्रमाणे सरकारी कर्मचार्यांचे पगार दर महिन्याला होतो त्याचप्रमाणे निराधार योजनेसाठी असणारे संजय गांधी निराधार योजनेचे पैसेदर महिन्याला मिळाले पाहिजे. टे्रझरी पैसे येउन देखील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा न करणार्या अधिकार्यांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी पंडित पाटील यांनी केली आहे. जर वेळेवर त्यांना पैसे मिळाले असते तर त्यांची दिवाळी गोड झाली असती लाखो रुपयांची उधळपट्टी करणार्या मंत्र्यांना गोरगरीबांची दया येऊ नये याचे आश्चर्य वाटते असे मत व्यक्त करतानाच सरकारी कर्मचार्यांना वेळेवर पगार देता त्यांना सातवा वेतन आयोग देता मग संजय गांधी निराधार योजनेचे पैसे दरमहा जमा करण्याची व्यवस्था करावी सरकारी कर्मचार्यांना ज्या प्रमाणे महागाई भत्ता मिळतो त्या प्रमाणे या लाभार्थ्यांना महागाई भत्ता का दिला जात नाही असा सवालही पंडित पाटील यांनी केला आहे.