राज्यात मविआचाच डंका; प्रस्थापितांना दणका

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने लक्षणीय यश संपादित केले आहे. राज्यात एकूण 253 बाजार समित्या असून त्यातील 18 बाजार समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर उर्वरीत 235 बाजार समित्यांपैकी 147 बाजार समित्यांची शुक्रवारी निवडणूक झाली आहे. शनिवारी या निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. या निवडणुकांमध्ये सत्ताधार्‍यांचा अनेक ठिकाणी पराभव झाला असून महाविकास आघाडीने  जोरदार मुसंडी मारली आहे.

जाहीर झालेल्या निकालापैकी मविआने 76 तर शिंदे, भाजपने 46 जागांवर विजय संपादित केलेला आहे. यामध्ये राष्ट्रवादी 35, भाजप 39, शिंदे गट 7, काँग्रेस 31, ठाकरे 10 इतर 10 असे संख्याबळ आहे.

Exit mobile version