। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला 49 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून देणार्या मीराबाई चानूला मणीपूर सरकारने प्रभारी पोलीस अधीक्षकांची नोकरी दिली असून, नुकताच तिने पदभार स्वीकारला. तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई करताच मणीपूरचे मुख्यमंत्री ए.बीरेन सिंग यांनी मीराबाईशी व्हीडीओ कॉलद्वारे संवाद साधत तिचे अभिनंदन व कौतुक केल होते. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री बीरेन सिंग यांनी एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करुन सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्ती करीत मीराबाईला प्रभारी पोलीस अधीक्षकांचा पदभार सोपविला आहे.
माळरानावर लाकडे गोळा करुन डोक्यावर मोळी बांधणारी मीरा ते ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता मीराबाई चानू हा तिचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यामुळेच, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिच्या यशाचे सेलिब्रेशन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मीराबाईचे कौतुक करत अभिनंदन केले होते.