गणेशोत्सवासाठी महावितरण कंपनीची तयारी

रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
येणार्‍या गणेशोत्सव काळात रत्नागिरी जिल्ह्यातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश मुख्य अभियंता श्री विजय भटकर यांनी दिले आहेत. या नुसारच सर्व वीज वाहिन्या, उपकेंद्रे यांच्या देखभालीची कामे सुरू असल्याचे जिल्हाभरात दिसून येत आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील गणेश उत्सव हा प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. या पार्श्‍वभूमीवर वीज ग्राहकांनी रोषणाई करताना योग्य ती दक्षता घ्यावी. गणेश मंडळांनी वीज पुरवठा घेण्यासाठी आपले तात्पुरत्या वीज जोडणी साठी अर्ज स्थानिक शाखा कार्यालयाकडे सादर करावेत. तसेच योग्य साहित्य वापरून वीज अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करावे असेही आवाहन महावितरण कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version