। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
नरेंद्र मोदी भारताचे खोटे पंतप्रधान असल्याचा घणाघात काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. याशिवाय भाजपवर सरकार चोरीचा आरोप केला आहे. सहाव्या आणि सातव्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या प्रचारासाठी अमेठीत पोहोचलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
अमेठी जिल्ह्यातील जगदीशपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर अनेक आरोप केले आहेत. मध्यप्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि गोव्यात काँग्रेसचे सरकार होते. परंतु, 10-20 कोटी रुपये देऊन आमचे सरकार चोरी केले. रोजगाराचा मुद्दा उपस्थित करीत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
मोदींनी पंतप्रधान होण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत राहुल गांधी म्हणाले, 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे भाषण केले होते. कोणाला रोजगार मिळाला आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधी म्हणाले, पीएम मोदींनी निवडणुका येताच हेलिकॉप्टरने 50 हून अधिक सभा घेतल्या, मात्र यावेळी त्यांनी एकदाही रोजगार देण्याबाबत बोलले नाही.
पीएम नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमध्ये येऊन तरुणांना का सांगत नाहीत, मी तुम्हाला रोजगार देणार आहे. ते बीएचएल विकत आहेत, एचएएल विकत आहेत आणि तेल कंपन्याही विकत आहेत. त्यांनी एअर इंडियाला विकले आहे. जनतेला संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना भारताचे खोटे पंतप्रधान असेही संबोधले.
भारताचे पंतप्रधान मतांसाठी काहीही बोलतील. नरेंद्र मोदींनी शेतकर्यांना त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर केंद्र सरकार तीन काळे कायदे घेऊन आले. तीन कृषी कायद्यांचे उद्दिष्ट आज शेतकर्यांना जे काही मिळते ते काढून घेणे आणि ते भारतातील सर्वांत मोठ्या अब्जाधीशांना देणे हे होते. – राहूल गांधी, काँग्रेस नेते