कामाची चौकशी करण्याची नागरीकांची मागणी
। जेएनपीटी । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवघर रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम 2021-22 मध्ये हाती घेण्यात आले होते. परंतु ठेकेदारांनी सदर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केल्याने रस्त्याची पाच महिन्याच्या कालावधीनंतर दुरवस्था झाली आहे. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रस्त्याच्या कडेला लागवड करण्यात आलेल्या नारळाच्या झाडांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे, तरी सदर कामांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
उरण तालुक्यातील नवघर गावाच्या परिसराचा औद्योगिकदृष्ट्या विकास झाल्याने या गावाच्या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू असते, परंतु उरण- पनवेल या मार्गावरून नवघर गावाकडे जाणार्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने त्याचा त्रास वाहन चालक, प्रवासी नागरीक यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्याचे काम ठेकेदाराने 2021 या वर्षी हाती घेतले. परंतु रस्त्याच्या दर्जाच्या कामामुळे सध्या रस्ता उखडला आहे. त्यामुळे रस्त्यातून मार्गक्रमण करणार्या प्रवाशी वाहनांना नागरिकांना अपघाताचा, धुळीचा सामना करावा लागत आहे. तरी सदर रस्त्याचा ठेका घेणार्या ठेकेदारांची व बांधकाम विभागाचे अधिकारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.