| कर्जत | प्रतिनिधी |
ईशाळवाडी दुर्घटनेनंतर माथेरान नगरपालिका सतर्क झाली असून, माथेरानमध्ये अशी दुर्घटना झाल्यास नागरिक सुरक्षित राहावेत याकरिता कड्यालगत राहणाऱ्या नागरिकांना नोटीसी दिल्या आहेत.
माथेरान नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी माथेरानमधील धोकादायक घरांची पहाणी करून तेथील लोकांना राहण्यास असुरक्षित वाटत असल्यास आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यांची नगरपालिकेने अशा नागरिकांची सोय कम्युनिटी सेंटर येथे करण्यात आली आहे. तर, अतिधोकादायक घरांना पालिकेने नोटीस दिल्या आहेत. 26 जुलै 2005 च्या अतिवृष्टीचा फटका माथेरान परिसरातील इंदिरा नगर भागाला बसला होता. यावेळी जीवितहानी झाली नसली तरी घरे कोसळून वित्तहानी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर पालिकेने इंदिरा नगर भागाची पाहणी केली. मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता अभिमन्यु यलंवडे, लेखपाल अंकुश ईजडे, शिपाई उमेश मोरे यांच्यासह पालिकेचे कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते किशोर मोरे उपस्थित होते.