। मुंबई । प्रतिनिधी ।
सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीबाबत महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं बदलला आहे. या निर्णयानुसार आता सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेतून होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.