ओबीसी समाज भडकला पाहिजे -आव्हाड

मुंबई | प्रतिनिधी |
ओबीसी आरक्षणावरुन ओबीसी समाजात आग लागली पाहिजे,असे प्रक्षोभक वक्तव्य राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेले आहे. आव्हाड यांनी आपल्या फेसबुक वॉलवरून ओबीसी आरक्षणाविषयी सविस्तर माहिती देऊन आपली भूमिका मांडली आहे.
जेव्हा 11 लाख लोकांचे प्रतिनिधित्व जातं, तेव्हा ती 11 लाख लोक जरी ओरडली तर अख्खा भारत देश जागा होईल. पण आरक्षण रद्द होऊन सुद्धा कुठे काही फार आग लागल्यासारखी दिसत नाही. ही आग लागावी हीच माझी इच्छा आहे आणि तेच माझे प्रयत्न आहेत.असेही आव्हाड यांनी सुचित केलेले आहे.
मी तुम्हाला सावध करतोय. माझ्यावर टिका करणार्‍यांनी जरून माझ्यावर टिका करावी. पण या 11 लाख लोकांचे काय करायचे याचेही उत्तर द्या. आम्हाला आमची 11 लाख पदे परत हवी आहेत म्हणूनच लढायचं, असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हंटलं आहे.

Exit mobile version