रायगड जिल्ह्यासाठी दिनांक 12 सप्टेंबर पर्यंत ऑरेंज अलर्ट

शासकीय यंत्रणा व नागरिकांना सतर्कतेचा इशारा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

प्रादेशिक हवामान विभागाने दिनांक 8 सप्टेंबर रोजी दिलेल्या सुचनांनूसार रायगड जिल्ह्यासाठी दिनांक 12 सप्टेंबर पर्यंत ऑरेंज अलर्ट दिलेला असल्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या कालावधी मध्ये विजांच्या व ढगांच्या गडगडाट व वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील. सर्व शासकीय विभागांनी सतर्क राहून आवश्यक मशीनरी आणि मनुष्य बलासह तात्काळ प्रतिसाद द्यावा.

दरड प्रवण पूर प्रवण भागातील नागरिकांनी या काळात दक्ष राहून वेळीच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालीन प्रसंगी जवळच्या पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय, नगर पालिका कार्यालयाशी संपर्क साधावा आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.

जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग
02141 222097/ टोल फ्री नंबर 112/ 1077 येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Exit mobile version