काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन

| चिरनेर | वार्ताहर |

पारस काव्य, कला, जनजागृती संस्था सानपाडा, नवी मुंबईतर्फ राज्यस्तरीय खुली काव्य लेखन स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम 22 डिसेंबर रोजी दुपारी 3.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन, सेक्टर-10 सानपाडा, नवी मुंबई, जुईनगर येथे संपन्न होणार आहे.

पुरस्कार सोहळ्याचे हे 13 वे वर्ष असून अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक पुंडलिक म्हात्रे भूषविणार आहेत. कार्यक्रम वेळेतच सुरू होईल तरी सहभागी सर्व स्पर्धक व विविध क्षेत्रातील पुरस्कार विजेत्यांनी मोठ्या संख्येने या पुरस्कार वितरण समारंभाला हजर रहावे असे आवाहन निमंत्रक तथा संस्थापक अध्यक्ष मंगेश चांदिवडे व आयोजिका शोभा चांदिवडे यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version