मिंधे गटातील 13 पैकी 10 खासदारांचे विसर्जन होणार

खासदार विनायक राऊत यांचा दावा
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
गद्दारी केलेल्या 13 खासदारांपैकी 3 लोकांना निवडणूक लढण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. बाकीच्या 10 जणांचे विसर्जन 100 टक्के होणार आहे. त्यांच्यातील बऱ्याचं जणांचे निरोप येत आहेत . सध्या कुणाचेही नाव सांगणार नाही. पण, मिंधे गटात मोठा भूकंप होणार आहे. एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत. फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता जाहीर होण्याच्या अगोदरच हा भूकंप होईल,” असा दावा विनायक राऊतांनी केली. गद्दारांनी उद्धव ठाकरे यांना शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत पडू नये, अशी टीकाही विनायक राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

ज्याप्रमाणे अन्नात भेसळ होते, त्याप्रमाणे हिंदुत्वात मिलावट करण्याचा प्रयत्न होतोय. हे हिंदुत्वाचे बेईमान झाले आहेत. जेवत्या ताटात कुणी घाण केली, हे विचारले तर जग नाव सांगेल. मुख्यमंत्र्यांचा तिळपापड होणं स्वाभाविक आहे. कारण, देशात इंडिया आघाडी ताकदवान होत आहे. लोकशाहीवादी सर्व पक्ष इंडिया आघाडीला पाठिंबा देत आहेत. समाजवादी संघटनांची ताकद उद्धव ठाकरेंकडे आल्याने इतरांचा जळफळाट होत आहे. इंडिया आघाडी 2024 साली चमत्कार करेल,” असा विश्वास विनायक राऊतांनी व्यक्त केला.

Exit mobile version