परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद

  | अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दि. 25 एप्रिल ते 10 मे  या कालावधीमध्ये दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.  या बंद कालावधीत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण कार्यालयाच्या वतीने सर्व स्थानिक यंत्रणासोबत समन्वय साधण्याकरिता व वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने समन्वय अधिकारी म्हणून सहाय्यक अभियंता, पंकज गोसावी मो.9561848502 व शाखा अभियंता अमोल माडकर मो.7038832535 यांची नेमणूक करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने अधिकार्‍यांशी समन्वय साधून वेळोवेळी गस्त घालणे व वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने कामकाज पाहण्याकरिता सहाय्यक कार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम मो.788813354, शाखा अभियंता रविंद्र भोये मो.9405366808, शाखा अभियंता श्री.राहुल विशे मो.8007257980, कनिष्ठ अभियंता अभिजित झेंडे मो.8262040257 या अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण यांनी कळविले आहे.

Exit mobile version