26 ऑगस्टला जनआक्रोश आंदोलन
। पेण । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावरुन गणेशभक्तांचा प्रवास सुखकार व्हावा, यासाठी जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन 26 ऑगस्ट रोजी सह्याद्री प्रतिष्ठान पेण, सोबती संघटना पेण आणि पेण पत्रकार यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
पेण तहसिल कार्यालयात सोमवारी तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनानुसार 25 ऑगस्टपर्यंत महामार्गावर पडलेले खड्डे शासनातर्फे भरण्यात आले नाही. तर, 26 ऑगस्टला महामार्गावरील खड्डे स्वखर्चानी व स्वकष्टानी खारपाडा ते खारपाले या दरम्यानचे खड्डे भरण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दोन दिवसापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांना घेऊन रस्त्याची पहाणी केली आहे. त्यामुळे 25 तारेखपर्यंत खड्डे भरण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे तहसिलदारांनी नमूद केले.
पत्रकारांनी तहसिलदारांना ठणकावून सांगितले की, अधिकारी वर्ग फक्त गोडगोड बोलतात. मात्र, कारवाई काही होत नाही. यावेळी, लेखणी सोडून पत्रकार फावडा, घमेली हातात घेऊन पत्रकार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे आम्हाला कागदीघोडे नको आहेत. तर आम्हाला निकाल हवा असल्याचे सांगण्यात आले. हावा आहे. यावेळी तहसिल कार्यालयामध्ये सह्याद्री प्रतिष्ठानचे समीर म्हात्रे, सोबती संघटनेचे अॅड मंगेश नेने व पेण तालुक्यातील पत्रकार मोठया संख्येने हजर होते. त्यानंतर प्रांत कार्यालयात देखील निवेदन देण्यात आले. तसेच, 23 ऑगस्ट रोजी निवेदन मुख्यमंत्र्यांना सुध्दा देण्यात येणार आहे.