। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची पावसाळ्याआधीच अवस्था दयनीय असल्याने याचा नाहक त्रास प्रवासी वर्गासह वाहन चालकांना करावा लागत आहे. तालुक्यातील काही रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा बनल्याने प्रवास करणे प्रवासी वर्गाला जिकरीचे बनले आहे.
माणकीवली शेणगाव रस्ता हा गेल्या काही वर्षापूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मे.विटकॉम इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपर्स प्रा.लि. या ठेकेदारांने नुतनीकरण बनवत हा मार्ग सुखकर बनवला होता. मात्र याच रस्त्या लगत तीन – चार खडी मिशनसह अन्य उद्योग असल्याने या खडी मशिनवरुन माल वाहतूक करण्यासाठी येत असलेले मोठमोठी वाहने ही आपल्या वाहनांच्या क्षमतेपेक्षा ओव्हरलोड वाहतुक करीत असुन याचा फटका रस्त्याला कामाला बसत असल्याने रस्त्याची दैनाच दैना झाली असून या ओव्हरलोड वाहतूक करणार्या वाहन चालकांना कोणाचा अंकुश आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पादचारी, दुचाकी, तीनचाकी वाहतूक करणार्यांना हा खड्डेमय रस्ता डोकेदुखी ठरत आहे. तरी प्रशासनाने या ओव्हरलोड करणार्या वाहनांवर दंडात्मक करीत या खडी मशीन मालकांनाही ओव्हरलोड वाहतूकीसाठी कडक नियम लावावेत अशी मागणी सध्या जोर धरत आहे. तर संबंधित प्रशासन या ओव्हरलोड वाहतूक करणार्यावर काय कारवाई करते याकडे सार्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
ओव्हरलोड वाहतूक करणार्या वाहनांविरोधात नाराजीचा सूड उमटत असून या ओव्हरलोड वाहतूक करणार्यावर प्रशासनाने कडक नियम लावावेत अशी मागणी जोर धरत आहे, तर संबंधित प्रशासन काय कारवाई करते याकडे सार्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.