सिंधुदुर्ग आणि अलिबागमधील स्थिती

| मुंबई | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्ग ठप्प आहे. कुडाळ पावशी येथे पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद आहे. अलिबाग तालुक्यात जोरदार पावसामुळे अनेक घरांत पाणी शिरले असून, घरातील वस्तूंचं नुकसान झालं आहे. मुंबईत सोमवारी सकाळी 1 ते सकाळी 7 या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. काही सखल भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Exit mobile version