। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील तीन दिवसांच्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. आता पुढील तीन तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आलंय. पुढील 3-4 तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.







