| नवीन पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेल पुलाला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. त्यामुळे या खड्ड्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी प्रवासी वाहनचालक व नागरिकांकडून केली जात आहे.
खड्ड्यांमुळे अर्धा तास वाहतूकीत अडकून राहावे लागते. या पुलावर दोन्ही बाजूने वर चढताना प्रचंड प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या खड्ड्यात आपटून अनेक वाहने खराब होत आहेत. खडतर प्रवास करून पुढे जावे लागत असल्याची खंत वाहन चालक व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी येथील खड्डे थातूरमातूर पद्धतीने बुजवण्यात आले. मात्र त्यानंतर काहीच दिवसात पुन्हा मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले दिसून येत आहेत. हे खड्डे चांगल्या पद्धतीने बुजवून होणार्या त्रासातून वाहनचालकांचे मुक्तता करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.